मोठी बातमी! जमीन खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता शेतजमीन खरेदी-विक्रीचेनियम बदलले आहेत. त्यानुसार आता जमीन-खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. राज्याचे नोंदणी महानिरिक्षक श्रावण हार्डीकर यांनी नवा आदेश जारी केला असून आता जमीन-खरेदी विक्री करताना काही नियम घालण्यात आले आहेत.
खरेदी विक्री नवीन नियम खालीलप्रमाणे :
● जिरायत जमीन : जिरायत जमीन 2 एकरापेक्षा कमी असल्यास खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज असणार आहे.
● बागायती जमीन : जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची किंवा खरेदी करायची असेल आणि जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे.
● दोन एकराचा गट असेल आणि त्यातील विकायची असेल तर 5 ते 6 गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही.
‘यांची’ परवानगी आवश्यक : जमिनीचे तुकडीकरण, वादविवाद आणि गुंतागुंत कमी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आता व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी 12 जुलैपासूनच सुरु झाली आहे. जर जमिनीतील काही गुंठ्याची खरेदी करायची असेल, तर सर्व्हे क्रमांकाचा ले आऊट करुन त्याला जिल्हाधिकारी वा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी गरजे आहे.
निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी : सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अगोदरच जमिन खरेदी-विक्रीत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात ही परवानगी वाढल्याने जमिनीची खरेदी विक्री करणे अवघड होऊन बसेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे. तुकड्यात जमिनीची विक्री करण्याची गरज केवळ लहान शेतकऱ्यांनाचं पडते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका लहान शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी एक परवानगी लागत असल्याने काम लवकर व्हावे यासाठी आर्थिक गैरमार्गचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकरी राज्य सरकारडे या निर्णयाचा पुनर्विचार करावी अशी मागणी देखील करत आहेत.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup