सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते. शरीराला हायड्रेट ठेवल्याने बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडण्याची समस्या होत नाही.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. असे केल्याने शरीराला उबदार करण्यासाठी अधिक ऊर्जा लागते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सकाळी पाणी प्यायल्यास ते शरीर डिटॉक्स करते. त्यामुळे किडनीतील घाण दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि निरोगी राहते.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. ही सवय चयापचय मजबूत करते ज्यामुळे वजन कमी होते.
सकाळी लवकर पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती देखील योग्य राहते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकता.
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केसही निरोगी राहतात. केसांच्या एक चतुर्थांश भागामध्ये पाणी असते. ज्याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि जास्त गळतात.