WTC Update : क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी..!! टीम इंडियाला मित्राने दिला मदतीचा हात, यानंतर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये एन्ट्री
WTC Update : सध्या सुरु असलेल्या अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. या सामन्याचा अवघ्या एका दिवसाचा खेळ राहिला आहे आणि अजून 15 हुन अधिक विकेट्सचा खेळ बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या हा चौथा कसोटी सामना निकाली निघण्याची फार कमी अपेक्षा असली, तरी उभय खेळाडूंचे त्यांच्या प्रदर्शनासाठी कौतुक होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे.
एकीकडे भारतीय संघ जो सध्या अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. पण आता श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळवली जाण्याची शक्यता असून ऑसी संघाने इंदोर कसोटीत टीम इंडियाला मात दिल्यानंतर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली.