सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक? महत्वपूर्ण सल्ला!
सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक असल्याने यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर हे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे.
यामुळे अशा परस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक? याबाबत शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी गडबड न करता सोयाबीनची साठवणूक करण्याचा सल्ला काही तज्ज्ञ मंडळी देत आहे.
यंद हंगामात नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्याने दर घटणार हे निश्चित होते. मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त घसरण झालेली दिसत आहे.
केंद्र सरकारने सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच आयात होण्यास सुरवातही होईल. मात्र जागतिक स्थरावरील सोयाबीनच्या दराची स्थिती पाहता याचा परिणाम दरावर होणार नसल्याचे चित्र आहे.
भविष्यात आवक किती होणार? कोणत्या स्टेजला सोयाबीनचे दर स्थिर होणार? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. त्यानंतरच दरामध्ये वाढ होण्यास सुरवात होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई गडबड न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणेच फायद्याचे ठरेल.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup