अभिनव प्रयोग! खराब अन्नधान्यापासून खतनिर्मिती…
गेल्यावर्षी भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शासकीय गोदामातील सुमारे 6 हजार क्विंटल अन्नधान्य भिजल्याने मोठी दुर्गंधी पसरली होती.
दुर्गंधीमुळे या अन्नधान्याला जनावरंही खाईना. यावर पर्याय म्हणून अन्नधान्यापासून खतनिर्मितीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं सरकारला पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.
आता हे अन्नधान्य साकोली कृषी विज्ञान केंद्रात पाठवलं जाणार आहे. येतेच या अन्नधान्यापासून कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे.
हा निर्णय म्हणजे एक अभिनव प्रयोगच आहे. जो आगामी संकटातही कसा मार्ग काढायचा उमेद देत आहे. या खत निर्मितीमुळे खराब अन्नधान्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup