IND vs SL 1st ODI : भारत-श्रीलंका वनडेसाठी ‘या’ सरकारची जय्यत तयारी, क्रिकेटप्रेमींना थेट हाफ डे सुट्टी जाहीर!
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका आटोपली असून आता एकदिवसीय सामन्यांचा थरारा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. हा अनुभव उद्यापासून पाहता येणार असून, विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर जसेकी रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात पुन्हा परतणार असून हे दिग्गज टी20 मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते.
या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार असून या सामन्यासाठी आसाम क्रिकेट असोसिएशन आणि तिथले सरकार या सामन्यासाठी पूर्ण तयारीत आहे. आसाम सरकारने या सामन्याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये नक्कीच उत्साहाचे वातावरण असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार.. आसाम सरकारने 10 जानेवारीच्या सामन्यासाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली असून मात्र, बारसापारा स्टेडियम असलेल्या कामरूप जिल्ह्यासाठीच ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर कामरूप जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि कामाची ठिकाणे सामन्याच्या दिवशी दुपारी1 नंतर बंद राहणार आहे.
तेथील स्थानिक सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वतः बरसापारा स्टेडियमची पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे.