शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
राज्यात मागील अनेक दिवसांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक जिल्ह्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या चांगलाच कोलमडला आहे. उत्पन्नाचा केवळ एक स्रोत असणाऱ्या शेतीतील पीकच नाहीसे झाले तर शेतकऱ्यांपुढे कोणता मार्ग उरेल ही एक चिंतेची बाब आहे. परंतु यासंदर्भात आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसान भरपाईबाबत मोठी घोषणा केली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहीतीनुसार :
“अनेक संकटांवर मात करून शेती पिकविणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून लवकरच मदत मिळणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे तर नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. यासोबतच पीक विम्याचे पैसे लवकरच मिळतील यासाठी शासन कटिबद्ध आहे”, असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार, यावरून विरोधकांकडून सतत निशाणा साधला जायचा. आता अनेक नैसर्गिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे 12 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल, यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. आता येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे”, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार ग्वाही दिली आहे.