भटकी जनावरे पिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत का ? ‘हे’ जुगाड करा!
अनेकदा भटकी जनावरे पिके खराब करतात अशी तक्रार तुम्ही ऐकल्या असतील. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. यावर पारंपरिक उपाय म्हणजे कुंपण घालणे. मात्र त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यूही होतो. अनेक राज्यांमध्ये तारबंदी देखील आहे. चला, तर आजच्या लेखात काही नैसर्गिक मार्ग पाहूयात, ज्याद्वारे पिकाला प्राण्यांपासून वाचवता येईल.
हल्ली भटक्या प्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी बायो-लिक्विड स्प्रे खूप उपयुक्त ठरतोय. यामुळे भटके प्राणी, वन्य प्राणी शेताच्या जवळही येत नाहीत. त्याची पिकामध्ये फवारणी केल्यास कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. उलट त्याच्या वापराने पिकातील कीटक आणि किडींचाही नायनाट होतो, हे विशेष.
अनेकदा शेतकरी पिकांच्या मध्यभागी बुजगावणी लावतात हे तुम्ही पाहिले असेल. शेतकरी बांधवांचा हा स्वदेशी जुगाड आहे. मात्र असे करूनही भटकी जनावरे शेतात जात नाहीत. पिकांचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी शेतात उभे असल्याचे जनावरांना वाटते, त्यामुळे त्यांना धोका आहे. त्यामुळे भटकी जनावरे शेतात येत नाहीत. शेतकर्यांना ते बसवणे खूप किफायतशीर आहे, कारण शेतकरी त्यांच्या घरी स्वतः बुजगावणं तयार करू शकतात.
हेही वाचा : सोलापुरातील पठ्याने लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग, नक्की कसं मिळालं यश?
शेताच्या कड्याभोवती औषधी पिके लावणे. कोणत्याही जनावरांना औषधी पिके खायला आवडत नाहीत. अशा स्थितीत शेताच्या बाजूने औषधी पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊन पीक सुरक्षित राहील, हे नक्की.
आपल्याकडे अनेक काटेरी वनस्पती आहेत ज्या उंच वाढतात. या काटेरी वनस्पतींचे किंवा निवडुंगाचे कुंपण शेताभोवती लावून जनावराना शेतात येण्यापासून रोखणे शक्य आहे. हा एक चांगला पर्याय आहे. काही शेतकरी आपल्या शेतात जुगाड करून सतत आवाज येणारी यंत्रे बसवतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी देखील जंगली प्राणी आणि भटक्या जनावरांपासून शेती पिकांना वाचवले जाते.