सरकार शेतकऱ्यांना दरमहा देणार 3000 रुपये; त्यासाठी ‘हे’ करा!
सरकारची पीएम किसान मान धन योजना म्हणजे शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देणारी योजना आहे. याअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी सहभागी होऊ शकतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करते.
दरमहा 3000 रुपये पेन्शन : योजनेमध्ये वयानुसार मासिक योगदानावर वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन 3000 किंवा 36,000 रुपये वार्षिक दिले जातात. मात्र यासाठी योगदान म्हणून दरमहा 55 ते 200 रुपये एवढी रक्कम द्यावी लागेल.
नक्की योजना काय? :
● 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
● लागवडीसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन असणाऱ्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत-जास्त 40 वर्षे योजनेंतर्गत सुमारे 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल.
● या अंतर्गत शेतकऱ्याच्या योगदानाच्या बरोबरीने सरकार योगदान दिले देणार आहे.
अशी करा मोफत नोंदणी! : यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन नोंदणी करा. यासाठी आधारकार्ड आणि सातबाऱ्याची प्रत लागेल. यासह दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँकेचे पासबुक देखील आवश्यक आहे. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिले जाईल. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
कमी रुपयांपासून सुरुवात करू शकता :
● तुम्हाला द्यायचे योगदान हे शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून असते.
● तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील झाल्यास तुम्हाला दरमहा 200 रुपये किंवा वार्षिक 2400 रुपये योगदान द्यावे लागेल.
जर योजना बंद करायची असेल तर : जर एखाद्या शेतकऱ्याने योजना मध्येच सोडली तरी त्याचे पैसे वाया जाणार नाहीत. तर योजनेत जमा रकमेवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज देखील मिळेल. एखादा पॉलिसीधारक शेतकरी मृत्युमुखी पडला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup