
Post Office Scheme | दररोज केवळ 50 रुपये जमा करा अन् 35 लाख मिळवा, ‘या’ सुपरहिट योजनाबद्दल नक्की वाचा Krushi doot
Post Office Scheme : आजकाल लाखो लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Rural Postal Life Insurance) अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी एक ‘ग्राम सुरक्षा योजना’ (Village Security Scheme) आहे. या योजनेसाठी तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून 35 लाखांपर्यंत मिळवू शकता.
Post Office Scheme कोण गुंतवणूक करू शकतो? :
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ग्राम सुरक्षा योजना योजनेत गुंतवणूक करू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेत किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपये आहे. या योजनेअंतर्गत प्रीमियम भरण्यासाठी विविध पर्याय दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात. इंडिया पोस्ट वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी 1995 मध्ये भारतातील ग्रामीण जनतेसाठी सुरू करण्यात आली होती.
Post Office Scheme बोनस मिळवा :
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चार वर्षांनी कर्जाची सुविधा मिळते. जर एखाद्या पॉलिसीधारकाला ती समर्पण करायची असेल, तर तो पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनी सरेंडर करू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीवर पाच वर्षांनंतर बोनसही मिळतो.
Post Office Scheme तुम्हाला किती मिळेल परतावा? :
ग्राम सुरक्षा योजनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या पात्र व्यक्तीने या योजनेत दरमहा 1,500 रुपये म्हणजेच दररोज फक्त 50 रुपये गुंतवले तर त्याला योजनेच्या मॅच्युरिटीवर 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
Post Office Scheme योजनेंतर्गत तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख :
रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास, 55 वर्षांपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये दरमहा जमा करावे लागतील.
Post Office Scheme तुम्हाला पूर्ण रक्कम कधी मिळेल? :
गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 31,60,000 रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 33,40,000 रुपये आणि 60 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत ही रक्कम व्यक्ती 80 वर्षांची झाल्यावर त्याच्याकडे सुपूर्द केली जाते. दुसरीकडे, जर व्यक्ती मरण पावली असेल, तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे जाते.
माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/