PM Krishi Udan Yojana : कृषी उडान योजनेचा विस्तार करण्याच्या सरकार तयारीत, 21 अतिरिक्त विमानतळांचा समावेश करण्याची योजना
PM Krishi Udan Yojana नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी सांगितले की कृषी उडान योजना खूप यशस्वी झाली आहे आणि केंद्र सरकार त्याअंतर्गत 21 अतिरिक्त विमानतळांचा समावेश करण्याचा विचार करत आहे.
Krishi Udan Yojana इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या G20 कृषी प्रतिनिधींच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी माहिती देताना सिंधिया म्हणाले की, किमान 31 विमानतळ कृषी उडान योजनेंतर्गत आहेत. कृषी उडान अंतर्गत आणखी २१ विमानतळांचा समावेश करण्यासाठी आम्ही संरक्षण मंत्रालयाशी (MoD) चर्चा करत आहोत.
Krishi Udan Yojana कृषी उडान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा :
कृषी उडान योजनेवर बोलताना ते म्हणाले की, विशेष विमानाद्वारे शेतकऱ्यांचा माल थेट बाजारपेठेत नेण्याची योजना अत्यंत यशस्वी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना थेट फायदा होत असून त्यांचे पीक अगदी कमी वेळेत थेट बाजारपेठेत पोहोचते. पुढे उदाहरणे देताना ते म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून ईशान्येकडील लिंबू, फणस आणि द्राक्षे देशाच्या इतर भागांतच नव्हे तर जर्मनी, लंडन, सिंगापूर, फिलिपाइन्स या देशांतही पाठविली जाणार आहे.
Krishi Udan Yojana बैठकीत ‘या’ चार गोष्टींवर लक्ष :
G20 कृषी प्रतिनिधींच्या पहिल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, प्रतिनिधी चार प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा करतील, ज्यात अन्न सुरक्षा आणि पोषण, हवामान स्मार्ट दृष्टिकोन असलेली कृषी; सर्वसमावेशक कृषी मूल्य साखळी आणि अन्न पुरवठा प्रणाली आणि शेतीचे डिजिटायझेशन.
Krishi Udan Yojana कृषी उडान योजना काय आहे? :
केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरू केली. शेतकऱ्यांची नाशवंत उत्पादने माफक दरात बाजारपेठेत पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकरी आपली पिके इतर बाजारपेठेत चांगल्या किमतीत विकू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना देशाच्या बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा पर्याय मिळतो.
आता थांबेल शेतकऱ्यांची फसवणूक… वाचा खतांचे अधिकृत दर…