शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी..!! आता घरबसल्या करता येणार पिकांची नोंदणी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता घरबसल्या आपल्या शेतजमीनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करता येणार आहे.
यासाठी महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने शेतकऱ्यांसाठी App विकसित केले असून त्यामुळे तलाठ्यांकडून पीक पाहणी अचूक नोंदवली जाणार आहे.
महसूल विभागाच्या रिअल टाईम नोंदणी सुविधेची माहिती विभागाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली. या ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्ट पासून राज्यभर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. तर तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे ही शक्य होईल, असे थोरात म्हणाले.
काल यासंदर्भात राज्य सरकारने शासन आदेश जारी केला असून ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुका स्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत
दरम्यान, ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर 20 तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup