सर्वसामान्यांना दिलासा..!! किरकोळ महागाई दर अखेर 9 महिन्यांनी नीचांकी पातळीवर
महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची व महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सरकार आणि आरबीआयच्या (RBI) अनेक महिन्यांच्या संघर्षामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नोव्हेंबरमध्ये महागाई (Inflation) अखेर नऊ महिन्यांनी नीचांकी पातळीवर आली आहे. यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने काल उशिरा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.88 टक्क्यांवर आली आहे. याआधी मागील 9 महिन्यांपासून किरकोळ महागाई हि 6% हुन अधिक होती. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी भारतातील किरकोळ महागाईच्या दराबाबत अंदाज व्यक्त करतांना सांगतले होते कि, नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर हा 6.3 टक्क्यांपर्यंत येऊ शकतो परंतु आता हा दर 6 टक्क्याहून कमी झाला आहे. जाणून घेऊया मागील काही महिन्यातील महागाई..
मागील 9 महिन्यातील महागाईचा दर…
▪️ जानेवारी ते मार्च 6.3 टक्के
▪️ एप्रिल ते जून 7.3 टक्के
▪️ जुलै ते सप्टेंबर 7 टक्के
दरम्यान, मागील काही महिन्यापासून तृणधान्ये आणि कडधान्यांचे भाव सातत्याने वाढत होते तर भाजीपाल्याचे भाव देखील कडाडले होते. एवढेच नव्हे तर काही खाद्यपदार्थांच्या उच्च किमतींमुळे सर्वसामान्य जनतेवर सतत दबाव पडत होता. मात्र आता नोव्हेंबरमधील बदलामुळे नक्कीच सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.