कृषी रसायने त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम
कृषी रसायने (Agro-Chemicals) आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम
कृषी रसायने (Agro-Chemicals) : हे कीटकनाशके आणि रासायनिक खते यासारख्या केमिकल्सला (chemicals) दिलेले नाव होय. कृषी रसायने मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीस आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यांना कृषी रसायने (Agro-Chemicals) म्हणतात.
मुख्यतः कृषीरसायने ही पिकाचे उत्पादन सुधारण्यासाठी जास्त प्रमाणात वापरली जात आहेत. हीच रसायने आपल्या जमीन आणि जल साठ्यांमध्ये मिसळतात आणि मानवाच्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. अशा रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने त्यांचे अवशेष शिल्लक राहतात. या अवशेषांमुळे विविध आजार जडले जातात. उदाहरणार्थ, हवेतील कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे माणसांमध्ये श्वसन आजाराचा धोका वाढू शकतो.
मातीवरील परिणाम :
शेतीमध्ये रसायनाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे ते फायद्याच्या इतर जीवांचा नाश करू शकतात.
मातीत नायट्रेटचे प्रमाण वाढते.
मातीचा सामू (पीएच) पातळी बदलते.
अनेक विषारी व रासायनिक रसायने आपल्या अन्न साखळीत प्रवेश करतात.
पाण्यावर परिणाम :
केमिकल युक्त पाणी आपल्या वापरासाठी योग्य राहत नाही.
पाण्यातील वाढत्या केमिकलमुळे पाण्यांमध्ये शैवालच्या (Algae) वाढीस चालना देतात त्यामुळे माशासारख्या जीव पाण्यात जास्त काळ टिकू शकत नाही .
पाण्याचे प्रदूषण वाढते त्याचबरोबर पाण्याचे रासायनिक गुणधर्म देखील बदलतात .
हवेमध्ये प्रदूषण वाढते :
कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशकांचे कण हवेने विखुरतात आणि हवेची रचना बदलतात.
वारा प्रदूषित होतो
श्वसन आजारांचा धोका वाढतो.