भारत – चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट; दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी
भारतातील अरुणाचल प्रदेशामधील तवांग सीमेवर भारतीय आणि चिनी (indian and china army) सैनिकांमध्ये 9 डिसेंबरच्या (9 dec) रात्री म्हणजे गेल्या शुक्रवारी दोघात झटापट झाली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 300 ते 400 सैन्याने सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घुसखोरीला भारतीय सैन्याकडून चोख देण्यात आले आहे. नेमके काय घडले त्या दिवशी वाचा सविस्तर..
चिनी सैन्याने कुठून घुसखोरी केली? काय घडले त्या दिवशी?
भारत आणि चीनदरम्यान ((indian and china army)) आंतरराष्ट्रीय सीमा अद्यापही निश्चित नाही. दोन्ही देशांदरम्यान 3000 किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 9-10 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास तवांग पूर्व येथील यांगत्से पॉईंटवर भारत-चीनच्या सैन्यात हा संघर्ष झाला. सीमेवरील या पॉईंटवर एक ओढा असून 9 डिसेंबर रोजी मध्यरात्री 300 ते 400 चिनी सैन्याने ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या घुसखोरीला भारतीय सैन्याकडून चोख देण्यात आले आहे.
भारत आणि चीनच्या सैन्यात काही तास हाणामारी सुरू होती. या संघर्षात एकही गोळी (Gun) झाडली गेली नाही. मात्र, लाठी-काठी, दगडांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय सैन्याने मोठ्या निर्धाराने चिनी सैन्याला आपल्या हद्दीतून हुसवाकाले.
दरम्यान, याआधी 15 जून 2020 (15 june) रोजी देखील गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताच्या 20 जवानांनी प्राणाचे बलिदान दिले होते. 9 डिसेंबर संघर्षात देखील अनेक सैनिक जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अजूनही भारतीय सैन्याकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला नाही.