sarkari yojana : ‘या’ योजनेतून गरीबही सुरु करु शकता बिझनेस, सरकार देते 50 हजारांपर्यंत कर्ज
sarkari yojana : देशातील गरिबी लवकरात लवकर घटण्यासाठी सर्वसामान्य जनतेने स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, यासाठी केंद्र सरकार अनेक सरकारी योजना राबवत आहे. अश्याच एका योजनेसंदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही योजना खास रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी असून तिचे नाव पीएम स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) आहे. कोविड महामारीच्या काळात रस्त्यावरील विक्रेत्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. असे लोक पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामुळे सरकारने पीएम स्वानिधी योजना सुरू केली.
नेमकी काय आहे हि योजना?
पीएम स्वानिधी योजनाअंतर्गत, सरकार रस्त्यावर विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. सरकारने ही योजना विशेषत: रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली आहे. ज्यात भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि लहान फास्ट फूडची दुकाने लावणाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीची गरज नाही. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.
50 हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे
केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. त्यामुळे या योजनेंतर्गत सर्वप्रथम, कोणालाही 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.
अशा प्रकारे तुम्हाला 50 हजारांचे कर्ज मिळेल
समजा एखाद्याला मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला भाजीचे दुकान लावायचे आहे. त्यासाठी त्यांनी स्वानिधी योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जाची रक्कम वेळेवर परत केली. अशा परिस्थितीत ती व्यक्ती दुसऱ्यांदा या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकते. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तो पात्र ठरणार आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावर सबसिडी देखील देते.