सोयाबीनचं नुकसान होऊ नये म्हणून ‘या’ गोष्टी करा!
सध्या उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीन काढणीला सुरवात झालीय. मात्र काढणीनंतर लगेच सोयाबीनची विक्री करावी की नाही? अधिकच्या दराची प्रतिक्षा करावी का? शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा? शेतकऱ्याकडे काय पर्याय आहेत? याबाबत जाणून घेऊयात…
● सध्या पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला कोंभ फुटलेले आहे. त्यामुळे या सोयाबीनची काढणी झाली की लगेच विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा साठवणूक केलेले हे सोयाबीन कुजेल. त्यामुळे आहे त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री करणे फायद्याचे ठरेल.
● ज्या सोयाबीनची काढणी पावसाच्या अगोदर झाली असेल त्या शेतकऱ्यांनी साठवणूकीला हरकत नाही. तसेच जे सोयाबीन डागाळलेले नाही त्याची साठवणूक केली तरी त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. भविष्यात सोयाबीनचे दर वाढू शकतात. त्याकाळात सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल.
● सर्वच शेतकऱ्यांची पीक साठवूण ठेवण्याची क्षमता नसते. त्यामुळे पावसात भिजलेल्या सोयाबीनला मिळेल त्या दरात विक्री करणे हीताचे ठरेल.
● शेतीमालाच्या साठवणूकीवर सध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम अदा केली जाते. त्यामुळे योग्य वेळी शेतीमालाला योग्य दर मिळू शकतो.
● पावसाने किंवा अन्य कारणाने सोयाबीन काळवंडले असेल तर साठवणूक करु नका. मिळेल त्या दरात त्याची विक्री करा.