Take a fresh look at your lifestyle.

ई-श्रमिक कार्डचे फायदे काय आहे? कोण यासाठी पात्र आहे?

0

केंद्र सरकारच्यावतीने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवली जाणारी योजना म्हणजे ई-श्रमिक कार्ड होय. सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी याची सुरुवात केलीय. त्यानुसार ई-श्राम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिला जात आहे.

योजनेस कोण पात्र आहेत? :
● यासाठी शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी नोंदणीसाठी पात्र आहेत.
● भारत सरकार देशातील कोट्यवधी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करत आहे.
● त्यासाठी केंद्र सरकारने एक ई-श्राम पोर्टल विकसित केले असून ते त्यांच्या आधार कार्डशी जोडले जाईल. याअंतर्गत नोंदणी मोफत आहे.

कोणते कामगार नोंदणी करू शकतात? :

● या नोंदणीसाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष नाहीत.
● केवळ कामगार हा आयकर भरणारा नसावा.
● 16 ते 59 वयोगटातील कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार नोंदणीसाठी पात्र आहे.
● नोंदणीसाठी आधार, मोबाईल क्रमांक, आधारशी जोडलेले बँक खाते यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
● पोर्टलवर नोंदणी करण्यास इच्छुक कामगारांना मदत करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – 14434
आहे.

वरील नंबरवर कॉल करून आपण कामगार माहिती आणि प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊ शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues