येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती!
येत्या 3 ते 4 दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात मध्यम पाऊस : रविवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मनाबाद, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाही.
13 सप्टेंबरला कुठे अलर्ट? : जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
14 सप्टेंबरला कुठे अलर्ट? : औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांची वाढू शकतो. 14 सप्टेंबरला औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला गेला आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup