Tips for 12th board exam : बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना ‘ही’ काळजी घ्या
बारावीची परीक्षा अगदी एक दिवसांवर आली आहे. पहिला पेपर उद्या म्हणजे 21 फेब्रुवारीला होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात…
- बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.
- परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट आणि ओळखपत्र काळजीपूर्वक घेऊन जावे.
- परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
- विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही.
- प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. त्यानुसार वेळेचे नियोजन करावे.
- उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक बरोबर टाकावा.
- प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करावी.
- खाडाखोड करणे टाळावे.
- प्रश्न बारकाईने वाचूनच उत्तर लिहावे.
Yawning : जास्त जांभई येणे हे ‘या’ आजारांचे लक्षण असू शकते, दुर्लक्ष करू नका नाहीतर होईल मोठे नुकसान