Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! राज्य सरकार कडून ‘ही’ योजना पुन्हा सुरु
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna महाराष्ट्रात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, अंगावर वीज पडणे, पूरस्थिती, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna राज्य सरकारकडून 6 वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना एप्रिल-2022 रोजी खंडित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा नव्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्य सरकारकडून सुरु करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘या’ ठिकाणी 8 ते 10 डिसेंबर मुसळधार पावसाचा इशारा
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna काय आहे ही योजना :-
समजा, कोणत्या शेतकऱ्याचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाखांपर्यंत मदत केली जाते. तसेच, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, तर दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची मदत केली जाते. राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली होती. विशेष म्हणजे, विम्याचा हप्ता शासन भरत असल्याने शेतकऱ्याला पैसे भरावे लागत नाहीत.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojna दरम्यान, कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सध्या अनेक योजना राबविल्या जात आहेत.