टोमॅटोचे भाव का कोसळले? नेमकं कारण काय? जाणून घ्या!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो भाव कोसळल्याने ठिक-ठिकाणी टोमॅटोचा ‘लाल चिखल’ पहायला मिळाला. मात्र टोमॅटोचे भाव एवढे का कोसळले? अशी वेळ या पिकावर का आली? याबाबत जाणून घेऊयात…
जिल्हे (वर्ष) आणि दर (वर्ष)
औरंगाबाद : ९.५० रु. (२०२०) I ४.५० रु. (२०२१)
कोल्हापुरा : २५ रु. (२०२०) I ६.५० रु. (२०२१)
सोलापूर : १५ रु. (२०२०) I ५ रु. (२०२१)
इतर राज्यांत काय चित्र आहे? :
दर आणि वर्ष –
कर्नाटक : १८.७० रु. (२०२०) I ५.३० रु. (२०२१)
आंध्र प्रदेश : ४० रु. (२०२०) I १८ रु. (२०२१)
उत्तर प्रदेश : २८ रु. (२०२०) I ८ रु. (२०२१)
प. बंगाल : ३४ रु. (२०२०) I २५ रु. (२०२१)
दिल्ली : ३६ रु. (२०२०) I २४ रु. (२०२१)
नुकसान नक्की कशामुळे? : यंदात अतिपीक झाल्याने टोमॅटोचे भाव गडगडल्याचे बोलले जाते आहे. पुरवठा अधिक तर किंमत कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशभरातील ३१ केंद्रांपैकी २३ केंद्रांवर टोमॅटोच्या दरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घसरण झाल्याची नोंद आहे.
यावर उपाय काय? : अन्नप्रक्रिया क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येऊन टोमॅटोची रास्त भावात खरेदी करावी, यासाठी प्रयत्न केले तर चित्र बदलू शकते.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup