Take a fresh look at your lifestyle.

Weather : आता तरी थांब रे पाउसा.. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण; या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता? बळीराजा चिंतेत

0

राज्यात हवामानात अचानक मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागात दिवसभर कडक उन्हाचा झळा तर रात्री थंडीचा कडाका पहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (maharashta weather update)

आणि याचाच मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता शेती तज्ज्ञकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी मागील 24 तासात अवकाळी पाऊस देखील झाला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले असून, याचाही पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

कोणत्या भागात काय परिस्थिती?

  • बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं ढगाळ वातावरण असून या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. यामुळे या भागात हरभरा, तूर, कापूस आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • गोंदिया व नांदेड जिल्ह्यात अनेक भागात धुके पसरले आहे. त्यामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
  • हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. या बदलामुळे हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या फळबागा संकटात सापडण्याची शक्यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues