हि शेती ठरते वरदान, एका एकरात मिळतात हजारो रुपये; वाचा या शेतीचे फायदे व लाभ
शेती क्षेत्रावर दिवसेंदिवस अनेक संकटे येत असताना,त्या संकटांचा बाऊ न करता त्यांना धैर्याने सामोरे जात महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतात नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग करताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी हे रेशमी शेती करून महिन्याला 80 ते 90 हजार रुपये कमवत आहेत.
सध्या रेशीम शेती केल्यास चांगल्या उत्पन्नाची हमी असल्याने शेतकरी वर्गासाठी हि शेती वरदानच ठरत आहे. राज्यातील अनेक शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करू लागले आहेत. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिक शेतीतून चांगला नफा देखील होत आहे. आणि या शेतीतून कमी वेळेत हजारो शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न हाती पडू लागले आहे. काय आहे रेशीम शेतीचे फायदे व या शेती पासून काय मिळतो लाभ वाचा थोडक्यात..
रेशीम शेतीचे फायदे :
▪️ कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते.
▪️ 15 दिवसात उत्पन्न मिळण्यास सुरुवात.
▪️ मजुराचा व इतर खतांचा खर्च वाचतो.
▪️ शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होते.
▪️ कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती हा नक्कीच एक सर्वात जास्त नफा मिळणारा व्यवसाय ठरेल.
रेशीम शेतीतून मिळतात हे लाभ
रेशीम उद्योग उभारणीसाठी शासनस्तरावर दोन महत्वाच्या योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून इच्छूकाला लाभ मिळणार आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या सिल्क समग्र या माध्यमातूनही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.