राज्यात लवकरच 3110 तलाठी पदांसाठी भरती होणार, शासन निर्णय जाहीर
तुम्ही तलाठी भरतीची वाट पाहताय? मग हि आनंदाची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून राज्यात लवकरच तलाठी भरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला शिंदे सरकारने मंजुरी दिली असून राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब होत आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन महसूल विभागाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.
विभागानुसार इतक्या पदांवर भरती होण्याची शक्यता :-
▪️ नाशिक विभाग – 1035 जागा
▪️ औरंगाबाद विभाग – एकूण 847 जागा
▪️ कोकण विभाग- 731 जागा
▪️ अमरावती विभाग 183 जागा
▪️ पुणे विभाग 746 जागा
दरम्यान, राज्यात तलाठी पदांची भरती झाली तर राज्यभरातील तलाठ्यांवरील ताण कमी होणार असून एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांच्या कामाला देखील गती मिळेल असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! राज्य सरकार कडून ‘ही’ योजना पुन्हा सुरु