Swanidhi Yojana : मोदी सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही आता मिळणार रोजगार
Swanidhi Yojana आपल्या सर्वांना माहिती आहे कि, भारतात फेरीवाले, हातगाडीवाले, तसेच टपरीधारकांची संख्या खूप आहे. कोरोना महामारीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या समाजातील या घटकांचे प्रचंड मोठे हाल झाले. याकाळात रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली होती. त्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकारने आणि विविध राज्य सरकारांनी फेरीवाले, टपरीधारक अन् हातगाडीवाल्यांसाठी विविध योजना आणली आहे.
Swanidhi Yojana काय आहे ही योजना?
Swanidhi Yojana देशात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या अधिक असून या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. या साठी केंद्राने स्वानिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे.
हेही वाचा : ‘या’ ठिकाणी 8 ते 10 डिसेंबर मुसळधार पावसाचा इशारा
Swanidhi Yojana याअंतर्गत तुम्हाला कर्ज देखील मिळवता येते :
Swanidhi Yojana स्वानिधी योजनेंतर्गत अर्ज केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. कर्ज घेतल्यानंतर वर्षभरात त्याची परतफेड करता येते. तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम भरून पैसे परतफेड करु शकता. मात्र, त्यात 20 हजार रुपये आणि 50 हजारांपर्यंतच्या कर्जाचाही पर्याय आहे.
Swanidhi Yojana दरम्यान, टपरीधारक, फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी योजनेचा फायदा घेता येतो. केंद्र सरकारने कुटुंबीयांसाठी आठ योजना सुरू केल्या आहेत