जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकार देतंय अनुदान; असा घ्या लाभ!
गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी राज्य सरकार तब्बल 77 हजार रुपयांचे अनुदान देत आहे. शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत या योजनेला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या या योजनेबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
अनुदान किती मिळणार? : गाई व म्हशी अशा दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधायचा असे तर गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. सहा किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे 12 जनावरांसाठी दुप्पट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान हे दिले जाईल.
योजनेचा लाभ कसा घेता येईल? :
● इच्छूक शेतकऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
● अर्ज करताना सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे अर्ज करीत आहात? त्या नावापुढे बरोबरची खून करा.
● त्यानंतर ग्रापंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटे चिटका.
● त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाका.
● आता तुम्ही ज्यासाठी अर्ज करीत आहात? त्यावर बरोबरची खुन करा.
अर्ज भरताना काय काळजी घ्याल? :
● अर्जामध्ये तुमच्या कुटुंब प्रकाराचा (अनुसुचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिलाप्रधान कुटुंब, अल्प भुधारक किंवा सीमांत शेतकरी) उल्लेख करा.
● तुम्ही जो प्रकार निवडलाय त्याच्या कागपत्राचा पुरावाही जोडावा लागेल.
● लाभार्थ्याच्या नावे शेतजमीन आहे का? असल्यास सातबारा, आठ ‘अ’ आणि ग्रामपंचायत नमुना जोडा.
● रहिवाशी दाखला जोडा. शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला ते काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्येच येते का? ते ही भरा.
● ज्यांनी अर्ज केलाय त्याच्या कुटुंबातील सदस्यसंख्या (18 वर्षा पुढील) नमूद करा.
● शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
● अर्जासोबत मनरेगा जॉब कार्ड, 8- अ, सात बारा उतारा, मालमत्ता नमुना 8 अ उतारा जोडा.
● त्यानंतर ग्रामसभेत ठराव घ्या.
● यानंतर तुमच्या कागपत्रांची छाननी होईल. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात का नाही? हे सांगितले जाईल .
● मनरेगाचे लाभार्थी असाल तरी तुम्हाला लाभ घेता येईल. मात्र जॉब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही.