पीएम किसान योजना : पती-पत्नीने दोघांनी अर्ज केला तर कोणाला पैसा मिळेल?
शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जात असतात. मात्र या योजनेसाठी काही नियम आणि अटी आहेत. या अटींवर ठरवले जाते की कोणाला लाभ मिळेल? कोणाला मिळणार नाही? तसेच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की, जर या योजनेसाठी पती -पत्नीने एकत्र अर्ज केला तर काय होईल? याबाबत आज माहिती पाहूयात…
नियमांनुसार विचार केला तर पती आणि पत्नी दोघेही एकाच वेळी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कारण कुटुंबातील केवळ एका सदस्याला लाभ मिळू शकतो. मात्र जर पती -पत्नी दोघांनाही कुटुंबात हप्ता मिळत असेल तर तो नियमानुसार वसूल केला जाऊ शकतो. यासह तो लाभार्थी देखील यादीतून वगळला जाईल.
2019 साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी अर्ज केले पण त्यांना लाभ मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे अर्ज करताना केलेल्या चुका आहेत.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup