आता फक्त शेतकऱ्याकडून तांदूळ खरेदी केला जाणार!
आगामी काळात तांदळाची खरेदी करताना तो तांदूळ शेतकऱ्यांनीच आणला आहे का? याची शहानिशा करण्यासाठी खरेदीवेळी जमिनीचे रेकॉर्ड पाहिले जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडून आधारभूत किमतीने तांदूळ खरेदी टळणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांचे डिजिटल रेकॉर्ड फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या रेकॉर्डबरोबर जोडले जाणार आहे. यासंदर्भात बहुतांश राज्यांनी तयारी केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
कारण शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत उत्पादित केलेला तांदूळ किंवा शेतकऱ्यांनी इतरांची जमीन भाड्याने घेऊन उत्पादित केलेला तांदूळ सरकारकडून आधारभूत किमतीने खरेदी करणार आहे.
निर्णयामागचा उद्देश काय? :
● शेतकऱ्याने किती जमिनीवर किती तांदूळ तयार केला आहे याची शहानिशा करणे.
● सरकारकडून फक्त या शेतकऱ्याच्या उत्पादनाची खरेदी केली जावी.
● व्यापाऱ्याकडून अशा उत्पादनाची खरेदी केले जाऊ नये.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवीन यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरु आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup