नवं डिजीटल कृषी मिशन येतंय! वाचा सर्व काही…
तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या अनुषंगाने केंद्र सरकारने 5 खासगी कंपन्यांशी करार केला आहे. यातून केवळ ऊत्पन्नच नव्हे तर उत्पादनांचे संरक्षणही होणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग राबविणे सहज शक्य होणार आहे. पेरणीसाठी कोणता वाण चांगली आहे? कोणत्या पद्धतीने उत्पादन वाढेल? अशी सर्व महत्वाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणात हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी ठरणार आहे.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी भवन येथे झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी कार्यक्रमा दरम्यान वरील माहिती दिली. सामंजस्य करार हा सिस्को, निन्जाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड यासह प्रायोगिक प्रकल्पांसाठी करण्यात आला आहे.
डिजीटल कृषी मिशन नक्की कसे असणार? :
● सरकारने आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग, जीआयएस तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट आदी वापरण्यासाठी 2021ते 2025 कालावधी लक्षात घेऊन हे मिशन सुरू केले आहे.
● कृषी क्षेत्र खऱ्या अर्थाने बदलण्यासाठी पर्यावरणाभिमुख दृष्टिकोन आणि डिजिटल इकोसिस्टमचा अवलंब करणे आवश्यक आहे.
● डिजिटायझेशनचे महत्त्व ओळखून, विभाग एक संस्थागत शेतकरी डेटाबेस तयार करण्याचे काम सुरु आहे.
● शेतीसाठी डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यासाठी वरील डेटाबेसच्या आसपास विविध सेवा विकसित केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन कसे होणार? : देशभरातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींशी जोडला जाणार असून एक वेगळा शेतकरी आयडी तयार केला जाणार आहे. या डेटाबेस अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे सर्व लाभ आणि सहाय्य संबंधित माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी ठेवली जाईल. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने ती माहितीचा स्रोत देखील बनू शकते.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup