आता सरकार मिटवणार जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद; ‘ही’ सरकारी योजना करेल यासाठी मदत
खरं पाहता जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद ही काही नवीन बाब राहिलेली नाही. अनेकदा असेही ऐकण्यात येते कि अनेक भाऊबंदकीतील वाद विकोपाला जातात आणि हे वादामुळे अक्षरशः काही प्रकरणे कोर्टाच्या दारी जाऊन पोहोचतात. यामध्ये अनेकांचे वेळ तर जातोच परंतु आर्थिक नुकसान देखील होत असते.
परंतु, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे अपडेट समोर आले असून जमीन मालकीवरून असणारी भाऊबंदकीचे वाद आता संपणार आहेत. कारण सरकारने यासाठी आता ‘सलोखा योजना’ (salokha yojana) आणली असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
आपण जर साधारण 45 ते 50 वर्षांपूर्वीचा विचार केला तर राज्य सरकारने राबवलेल्या जमीन एकत्रीकरण योजनेमध्ये काही चुकीच्या नोंदी झाल्या होत्या. व सरकारच्या या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच प्रकारचे गोंधळ निर्माण झाले होते. परंतु आता शासनाच्या माध्यमातून अशा चुकीच्या नोंदी होऊन शेत जमिनीच्या मालकी हक्काबाबत जो काही गोंधळ झालेला आहे तो गोंधळ राज्य सरकार नव्याने ‘सलोखा योजना’ राबवून दूर केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता गावात असणारे जी काही तंटामुक्ती समिती असते तिला विश्वासात घेतले जाणार असून जे काही गावात शेतजमिनी बाबतचे परस्पर वाद विवाद आहेत त्या विषयावर आता तोडगा काढला जाणार आहे. म्हणजे जो शेतकरी किमान 12 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ जमीन कसत असेल ती परस्पर समजोत्यानुसार त्याच्या नावे केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – ‘या’ ठिकाणी आहे देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह बियाणे फार्म, जाणून घ्या सविस्तर
बातमी कामाची! शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ‘इतके’ अनुदान
सलोखा योजनेचा नेमका फायदा काय?
▪️ या योजनेमुळं शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल.
▪️ विविध न्यायालयातील प्रकरणे लवकर निकाली निघतील.
▪️ या योजनेमुळं भूमाफीयांचा अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही.