सुटकेचा निश्वास! शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबली…
गेल्या काही महिन्यांत शेतकर्यां अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकर्यांची वीज कनेक्शन तोडू नये, याची मागणी केली जात आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्याबाबतचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
आदेश मिळाल्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शेतकर्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली.
सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत, त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकर्यांवर अतिवृष्टी व पूर परिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी शेतकर्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवा.
हेही वाचा : कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, महाराष्ट्रात भाव ‘इतके’ घसरले, इतर पिकांचीही अवस्था वाईट