Take a fresh look at your lifestyle.

kanda Chal ; फक्त ‘या’ गोष्टी करा, कांदा चाळीत सडणार नाही Krushi doot

0

kanda Chal कांदा पिकाचा विचार केला तर दराच्या बाबतीत कायम अनिश्‍चित असलेले पीक आहे. कधीकधी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वाढीव दर मिळतो तर कधीकधी झालेला खर्च सुद्धा निघणे कठीण होते, असे हे पीक.

kanda Chal बाजारपेठेत जर कांद्याला दर चांगले नसले तर बरेच शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवतात. परंतु कांदा साठवत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तर चाळीत देखील कांदा सडायला लागतो व शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागते. आपण चाळीत कांदा साठवायचा असेल तर काढणी करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊ.

kanda Chal कांदा चाळीत साठवणे आधीची काळजी :

kanda Chal १. पिकाची काढणी केल्यानंतर पातीसोबत कांदा सुकवा : यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कांदा काढणी सुरू करतो त्यावेळेस त्याला लागलीच न खांडता अगोदर तीन ते चार दिवस पातीसोबत वाळवणे
खूप महत्त्वाचे असते.

kanda Chal याचा फायदा असा की, कांदा साठवणूक केल्यानंतर कांद्याला सूप्तपणा देणारे जे जीवनसत्व असतात ते जीवनसत्व हळूहळू पातीतून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे जमिनीतुन काढल्यानंतर पात सुकेल तोपर्यंत शेतात वाळवणे गरजेचे असते. परंतु हे करीत असताना कांद्याचा ढीग न करता जमिनीवर एकसारखे पसरवून त्यांना सुकवावे.

kanda Chal २. कांद्याची मान न कापता फक्त कांदा पात कापणे : ही गोष्ट प्रत्येक शेतकरी करीत असतो. कांदा शेतामध्ये तीन ते चार दिवस वाळविल्यानंतर त्याची पात चांगली सुकली की कांद्याच्या मानेला पीळ देऊन एक ते दीड इंच मान ठेवून कांदाचे पात कापावी. त्यामुळे साठवणूक करताना कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहते व त्यामुळे कांद्यामध्ये सूक्ष्म जिवाणूंचा शिरकाव होत नाही व कांदा सडत नाही. तसेच कांद्याचे बाष्पीभवन होऊन कांद्याच्या तोंडातून मोड येणे किंवा वजनात घट होण्यासारखे प्रकार आहेत ते टाळता येतात.

kanda Chal ३. कांदा चाळीत भरण्याअगोदर तीन आठवडे झाडाच्या सावलीत वाळवणे : कांदा तीन आठवडे सावलीत चांगला वाळल्यानंतर कांद्यामध्ये साठलेली उष्णता हळूहळू बाहेर पडते व कांद्याच्या बाहेरील साली मध्ये असलेले पाणी पूर्णपणे सुकते व त्याचे पापुद्रात रूपांतर होते. हे कांद्याचे पापुद्रे साठवणुकी मध्ये कांद्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. कांद्यामध्ये असलेले जास्तीचे पाणी व उष्णता निघून गेल्यामुळे कांदा सडत नाही व कांद्याच्या बाहेर पापुद्रा तयार झाल्यामुळे वातावरणातील आद्रता व रोग तसेच किडीपासुन कांद्याचा बचाव होतो.

kanda Chal तसेच बाष्पीभवन रोखले गेल्यामुळे साठवणुकीत कांद्याच्या वजनात घट येत नाही. त्यामुळे हे तीन तंत्र बरेच शेतकरी वापरतात परंतु अजूनही काही शेतकरी वापरत नाहीत. त्यामुळे या तीन तंत्रांचा वापर करावा व चार ते सहा महिन्यांपर्यंत कांदा चांगला टिकवावा.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues