यंदा मान्सून हवामान खात्याने वर्तवला अंदाज
यंदा मान्सून 101 टक्के; हवामान खात्याने वर्तवला अंदाज!
भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे आलेला पाऊस, हा भारतीय शेतीसाठी आणि खरीप हंगामासाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्यामुळे शेतकरी आणि कष्टकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतात. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे. यंदा हवामान खात्याने 31 मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असे भविष्य वर्तवले होते. मात्र, सर्व अंदाजांना मोडीत काढत अजून मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला नाही. सध्या तिथे आम्रसरी बरसत असून, किनाऱ्यालगतचा भाग पावसामध्ये चिंब न्हाऊन निघत आहे. हवामान खात्याने या वेळी भारतामध्ये 101% पर्जन्यवृष्टी चा अंदाज वर्तवल्यानंतर, यावेळी भारतासाठी समाधानकारक पावसाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हवामान खात्याने यापूर्वी 98% पर्जन्यवृष्टी चा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता सुधारित अंदाजानुसार 101% मान्सून प्रभावीरीत्या बरसणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागामध्ये पूर्वीच्या अंदाजानुसार भरपूर पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नव्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी या भागात होणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रशांत महासागरामध्ये असलेली सुस्थिती मान्सूनला सकारात्मक राहील आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Khoob Chand