Take a fresh look at your lifestyle.

Heat Wave : राज्यात पुढील 3-4 दिवस उष्णतेची तीव्र लाट, वाचा हवामान सतर्कतेचा इशारा..

0

Maharashtra Heat Wave : राज्यात सध्या उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहे. राज्यात दुपारी ऊन तर रात्रीच्या वेळी थंड वातावरण मागील काही दिवसांपासून सातत्याने दिसत आहे. तर पुढील दोन तीन दिवसांपासून पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्यात दुपारी ऊन आणखी वाढणार असून येत्या 2 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी उन्हाचे चटके वाढणार असून अंगाची लाही लाही होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत येत्या 48 तासांत उन्हाचे चटके वाढणार असल्याने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तर या वेळेत बाहेर पडल्यास पिण्याचे पाणी आपल्यासोबत नेहमी ठेवा, असंही हवामान विभागाचे के. एस. होसळीकर यांनी सांगितलं आहे.

राज्यासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 37 ते 39 ℃ च्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उचांकी तापमान 37.9 अंश नोंदवले गले आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तिथे आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 40℃ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पाराही 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटांचा काहीसा परिणाम दिसू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues