हरितगृहाचे फायदे व त्यासाठी जागेची निवड कशी करावी?
भारतातील तसेच राज्यातील हवामान हे हरितगृहातील फुलशेतीस तसेच भाजीपाला व इतर फळपिकांच्या उत्पादनास पूरक आहे. तसेच असे हरितगृह उभारण्यासाठी येणारा खर्च देखील युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण हरितगृहासाठी जागेची निवड कशी करावी? याबद्दल अधिक जाणून घेऊयात…
‘हे’ आहेत हरितगृहाचे फायदे!
● फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादन संपूर्ण वर्षभर घेता येते.
● तसेच बिगर हंगामी फुलांचे अधिक उत्पादन देखील घेता येते.
● पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 ते 5 पटीने अधिक उत्पादन घेणे शक्य येते.
● लांब दांड्याच्या फुलांचे निर्यातक्षम उत्पादन घेता येते.
● कीड व रोगांचे नियंत्रण सहज शक्य होते.
● ठिबक सिंचनाद्वारे खते व्यवस्थापन करता येते.
● विद्राव्य खतांचा वापर सुलभतेने व व्यवस्थित करता येतो.
● फुलांची संख्या व दर्जा यामध्ये गुणात्मक वाढ होते.
● बाजाराचा अंदाज घेऊन उत्पादन कमी-अधिक करता येते.
● विविध नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व्यवस्थित करता येते.
● उतिसंवर्धन आधारे तयार केलेल्या रोपांची वाढ करणे, रोपवाटिका तयार करणे शक्य होते.
जागेची निवड कशी करावी? आवश्यक बाबी काय?
● शेतावरील उंच सखल व सपाटीकरण केलेली जागा निवडा.
● मोठ्या वृक्षांच्या सावलीतील किंवा इमारतीच्या सावलीतील किंवा इमारतीच्या आडोश्याची जागा हरित पुलासाठी निवडू नका.
● भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या जागेची निवड करा.
● पाणीपुरवठाच्या सुविधा जवळपास आहे कि नाही? पहा. पाण्याचा सामू साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान व पाण्याच्या क्षारतेचे प्रमाण 0.2 ते 0.5 मिली असणे अपेक्षित आहे .
● जमिनीचा सामू साडे सात पेक्षा अधिक असेल व क्षारतेचे प्रमाण 0.5 मिलीमोहज पेक्षा जास्त असेल व जमीन लाल रंगाची वालुकामय पाण्याचा निचरा होणारी नसेल व काळी चिकन, पाण्याचा निचरा न होणारी, क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याची निचरा होणारी वालुकामय माती वाफे करण्यासाठी आणावी लागेल.
🌾 शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : 👉 https://instabio.cc/krushidootgroup