टेक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांना ‘Google’ सीईओ सुंदर पिचाईंचा सल्ला, यावेळी पिचाईं म्हणाले..
Google गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये पिचाई भारतात चालू असलेल्या तांत्रिक प्रगतीबद्दल बोलले आणि देश कसा विकसित होत आहे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोठे केंद्र बनत आहे, याची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी तंत्रज्ञान क्षेत्रात शिरू पाहणाऱ्या नवीन तरुणांना सुंदर पिचाईं यांनी काही सल्ले दिले आहे.
सुंदर पिचाईं म्हणाले :
जेव्हा आपण देशातील तंत्रज्ञान आणि त्याच्या होणाऱ्या प्रगतीबद्दल बोलतो, तेव्हा बहुतेक लोकांना असे वाटते की, तंत्रज्ञान जग केवळ प्रोग्रामिंग आणि इंजिनिअरिंगवर चालले आहे. मात्र, तंत्रज्ञान उद्योग केवळ सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या बळावरच उभा नसून तो विविध विभागांच्या कौशल्यावर उभा आहे.
नवीन पिढीने केवळ प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी (इंजिनिअर) सारख्या पारंपरिक विभागांशिवाय इतर संधींचा विचार करण्याचा सल्ला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिला. ते गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये बोलत होते.
दरम्यान, यावेळी पिचाई यांनी अनेक उत्पादने, प्रकल्प आणि ‘एआय’वर आधारित उपयांची घोषणा केली असून लवकरच ते भारतात लाँच केली जाणार असल्याची देखील घोषणा पैचाई यांनी यावेळी केली आहे.
Agriculture Startup: सरकारकडून 25 लाख रुपये घ्या आणि तुमचा स्वतःचा सुरू करा कृषी स्टार्टअप व्यवसाय