आनंदाची बातमी! राज्यात लवकरच 4000 पदांसाठी भरती होणार; विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा
विधीमंडळाचे राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना 20 एप्रिल, 2022 रोजी नागपूरमधील भूखंड वाटपात अनियमितता केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यासाठी मंगळवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केला. यानंतर आजचा तिसरा दिवस सुरु होताच वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केले आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले :
राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार आहे.
तसेच मंत्री महाजन म्हणाले कि आम्ही एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले असून सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. तर या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करणार असल्याचे सांगतले आहे.
दरम्यान, विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचाआज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा : टेक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांना ‘Google’ सीईओ सुंदर पिचाईंचा सल्ला, यावेळी पिचाईं म्हणाले..