औषधी वनस्पतींची लागवड करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर!
भारतात हजारो प्रकारच्या औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. आत्तापर्यंतचा विचार केला तर शेतकरी जेव्हा या औषधी वनस्पती लागवड करत. तेव्हा त्यांना या विक्रीतून म्हणावा तसा नफा किंवा बाजारपेठ मिळत नव्हती. आता केंद्र सरकारने यासंदर्भात पाच हजार कोटींचा मेगा प्लॅन तयार केला आहे. हर्बल शेतीशी जोडलेल्या शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा होणार आहे.
भारत सरकारने एक सर्वेक्षण केले त्यानुसार, सुमारे 8000 झाडे आणि रोपांचा वापर औषधासाठी केला जात असतो. त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आणि औषधांना परदेशात चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
यामुळे या शेतकऱ्यांसाठी हर्बल शेतीचा नवा पर्याय खुला झालाय.
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने यासाठी जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत केली आहे. आगामी काही वर्षांत 10 लाख हेक्टर क्षेत्र 4,000 कोटी रुपये खर्च करून औषधी वनस्पतींच्या लागवडीखाली आणली जाणार असल्याने शेतकऱ्यांना यातून 5,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
लवकरच औषधी वनस्पतींच्या प्रादेशिक बाजारपेठांचे जाळ देखील निर्माण करण्यात येणार आहे. ही शेती देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अश्वगंधा, गिलोय, भृंगराज, सातवार, पुदिना, मोगरा, तुळशी, कोरफड, ब्राह्मी, शंखपुष्पी आणि गुलर सारख्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड करून मोठी आर्थिक कमाई केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे औषधी पिकांना जास्त देखभाल किंवा पाण्याची गरज नसते. त्यातल्या त्यात काही औषधी वनस्पती कमी वेळात तयार होतात. एकदा त्यांची लागवड केली की, शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळतं. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने औषधी वनस्पतींची शेती करुन अगदी कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवू शकतो.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup