Do you know : भारतात केवळ एक तास इंटरनेट बंद पडलं तर काय होईल?
Do you know : डिजिटल क्रांतीनं जगभरात सामान्य माणसाचं आयुष्य बदलून टाकलंय. व सध्या मोबाईल आणि इंटरनेट ही मनुष्याची गरजेची गोष्ट झाली आहे. आताच्या घडीला लहान, मोठे, गरीब, श्रीमंत कोणीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मात्र, जर तुम्ही कधी असा विचार केला आहे का? जर संपूर्ण देशात 1 तासांसाठी इंटरनेट गेले तर काय होईल.. चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आता एकाच ठिकाणी…
मिळालेल्या रिपोर्टनुसार भारतात जर पूर्ण देशात एक तासासाठी नेटबंदी केल्यास 442 कोटींपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. तथापि, पूर्ण देशात एकाच वेळी नेटबंदी होऊ शकत नाही. मात्र याची संख्या जितकी जास्त असते नुकसानही तितकेच जास्त होते. 2018 नंतर 2022 हे पहिले वर्ष होते, जेव्हा भारतात एकूण नेटबंदीच्या घटना 100 पेक्षा कमी होत्या. मात्र यातही 14 वेळा नेटबंदी 24 तासांपेक्षा जास्त होती.
भारतात इंटरनेट शटडाऊन्सचा डेटा गोळा करणारे व्यासपीठ Internetshutdowns.in नुसार 2012 पासून ते आतापर्यंत भारतात एकूण 697 वेळा नेटबंदी झाली आहे. 2023 च्या दोन महिन्यांतच भारतात 7 वेळा नेटबंदी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.