पिकाचे नुकसान झालाय? आता सरकार करणार भरपाई, मात्र तुम्हाला हे काम करणे आवश्यक
बऱ्याचदा राज्यातील शेतकऱ्यांना सततच्या बदलत्या हवामानामुळे मोठा फटका बसतो. अनेकदा तर काढणीला आलेल्या पिकांचे देखील मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. अशा वेळी जर पिकांचंच नुकसान झालं तर शेतकरी कर्ज फेडणार कुठून हा प्रश्न असतो. मग अशावेळी पिकाचा विमा देखील उतरवला जातो. ज्यामुळे नुकसान झाल्यास सरकारकडून त्याची एक ठरावीक रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.
दरम्यान, जर वादळामुळे पिकाचे नुकसान झाले किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा पडू शकतो. हा बोजा कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे.
पीक विमा योजनेत विमा मिळाला तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. सध्या रब्बी पिकांचा विमा उतरविला जात असून 31 डिसेंबरपर्यंत या योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर लवकर ही नोंदणी करून घ्यावी अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ?
या योजनेअंतर्गत शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला जात असून सहकारी बँका किंवा किसान क्रेडिट कार्डकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऑटोमेटिक विमा मिळतो. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे सहकारी बँकांची कर्जे नाहीत, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
कधी मिळतो या योजनेचा लाभ :
▪️ जर कमी पाऊस झाल्यास, अथवा प्रतिकुल हवामान नसल्याने पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळतो
▪️ अवकाळी पाऊस, महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान
▪️ गोठ्यात किंवा शेतात ठेवलेल्या पिकावर चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा परिणाम झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.
Agriculture Budget : मोदी सरकारने कृषी बजेट वाढवले, आता 6.22 लाख कोटी रुपयांची तरतूद