मोठी बातमी! महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा सोबतच होणार; केंद्रीय मंत्र्यांचा दावा
राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे.
नेमके काय म्हणाले मंत्री दानवे?
भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, आताच्या घडीचे राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. एवढेच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते निवडणुकेआधी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्यावधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा : ओमायक्रॉनचे सब-व्हेरियंट BF.7 किती धोकादायक? कोविड लस किती प्रभावी? जाणून घ्या सर्व काही!