मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर
SBI सीबीआय चौकशी करत असेलेले तसचे भ्रष्टाचार व वसुली प्रकरणी अटक असलेले महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) काळात गृहमंत्री म्हणून काम करणारे अनिल देशमुख (anil deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तब्बल 13 महिन्यांनंतर अनिल देशमुख लवकरच तुरुंगाबाहेर येणार आहेत.
दरम्यान, देशमुख यांना आणखी 10 दिवस तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे. कारण त्यांच्या जामिनास 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली असून कारण मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहेत.
अनिल देशमुख यांच्या अटकेचे नेमके कारण काय?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द गाजली होती. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा दावा सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.