राईस मिल : एक शेतीपूरक व्यवसायसंधी
शेतीशी निगडित असणाऱ्या तरुणांना सहजतेने करता येईल असा हा उद्योग. खेड्यातील तरुण तसेच शहरी भागातील बेरोजगार तरुण देखील शेतकऱ्यांकडून कच्चामाल खरेदी करून त्या मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकू शकतात.
वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज जास्त प्रमाणात भासते. शेतीतून उत्पादित तांदळावर असणारे टरफले काढून त्याच्या आतील भाग हा तांदूळ वापरला जातो. या तांदळावर प्रक्रिया करून आपण चांगला व्यवसाय करू शकतो. आता आपण राईस मिल या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.
कसा करावा राईस मिल व्यवसाय ?
राईस मिलमध्ये रोज हजारो टन धान्याचे कांडप, त्यावर प्रक्रिया करून व ते धान्य त्याच्या प्रतवारी प्रमाणे वेगळे करून व स्वच्छ करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पाच किलो पासून 50 किलो पर्यंतच्या बॅगेतपॅक केले जाते. तांदळामध्ये बासमती,इंद्रायणी, आंबेमोहर,कोलम आशा तांदळाच्या प्रमुख व मुख्य मागणी असलेल्या जाती आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे भात खरेदी करायचे व ते राईस मिल मध्ये आणून प्रक्रिया करून तो बाजारात विकत व आपला ब्रँड तयार करतात.
हीच पद्धत जास्तीत जास्त राईस मिल व्यवसायिक वापरतात. भांडवलाची क्षमता असलेल्या नवउद्योजकांनी या व्यवसायात येण्यास काहीच हरकत नाही.
ग्रामीण व शहरी भागातील सर्वच किराणामाल दुकानांमध्ये तांदूळ विकला जातो. तसेच सुपर मार्केट, अन्नधान्याचे ठोक तसेच होलसेल व्यापारी, मोठमोठे मॉल यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मालपुरवठा करता येतो. (स्रोत : कृषि जागरण)
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup