ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे असेही फायदे!
ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे नक्की काय-काय फायदे होतात? तसेच पाचट काढताना काय चुका होतात. जाणून घेऊयात…
● पाचट काढल्याने संख्या नियंत्रण होते. जाड कोंब ठेवुन लहान मरके कोंब काढले जातात.
● हवा खेळती राहिल्याने जाडी वाढण्यास मदत होते.
● नविन वॉटर शूट फुटून आल्याने ऊस जोमदार व वजनदार बनतो.
● कांडी कीड,मिलिबग तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
● उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याची बचत होते.
● तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
● जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..
पाचट काढताना होणाऱ्या ‘या’ चुका टाळा :
● उसाचे बुडातील 4 ते 5 टोपणे सुकून जातात. त्यावेळी उसाचे पाचट काढा.
● पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढा. हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील ऊसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नये.
● हिरवी पाने काढल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन उसामध्ये अन्न कमी तयार केले जाते व पर्यायाने उसाची वाढ कमी होते.
● उसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात काढू नये.
———————————————————–
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/
———————————————————–