सावधान…! पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात आज 19 सप्टेंबर-रविवारपासून पुढचे 3 दिवस काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असू शकतो.
मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं असून कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊसाची शक्यता पाहता नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकरण बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलेले आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup