आणि शेतकऱ्याने ‘नंद्या’च्या मृत्युनंतर दशक्रिया, तेरावा विधी केला
एका कुटुंबीयांनी 22 वर्षांपासून सांभाळलेल्या बैलाविषयीची व्यक्त केलेली कृतज्ञता पाहून तुम्ही अवाक् व्हाल. हे कुटुंब आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील रेटवडी गावात काळे कुटुंबीया. त्यांच्या बैलाचे नावं होते ‘नंद्या’. काही दिवसांपूर्वीच त्याचे निधन झाले.
गेल्या दोन दशकापासून आपल्या सोबत असलेल्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करत या कुटुंबीयांनी नंद्याच्या मृत्युनंतर माणसाप्रमाणे दशक्रिया, तेरावा विधी गावकरी नातेवाईकांच्या उपस्थित केला. 4 महिन्याचे वासरु ते 22 वर्षांचा सहवास पाहता ‘नंद्या’ काळे कुटुंबाच्या सदस्य बनला होता. आयुष्यभराची साथ देणाऱ्या बैलाचा शेवट गोड केल्याने याची चांगलीच चर्चा होत आहे.
जवळपास 22 वर्ष काळे कुटुंबासोबत नंद्याने कष्ट केले म्हणून आज बैलांच्या गोठ्यातील त्याची जागा रिकामीच ठेवली गेली आहे. नंद्याच्या जाण्याने जेवढं दुख माणसांना झालं त्यापेक्षाही अधिक दुःख त्याच्या सहकारी बैलांना झालं आहे. बळीराजा आपल्या बैलाला पोटच्या मुलासारखा संभाळ करतानाची हि घटना डोळ्यात टचकन पाणी आणणारी आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup