…आणि ‘या’ महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय शेती!
आजकाल नाईलाजास्तव ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतात. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार याला अपवाद आहेत.उच्च शिक्षण घेऊनही नीता वैशिष्ट्यपूर्ण शेती करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे. मात्र कशा पद्धतीने शेती करतात? याबाबत जाणून घेऊयात…
गोंदिया जिल्हा धानशेतीसाठी प्रसिद्ध आहे. सध्याचा विचार केला तर प्रत्येकजण उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. यामुळे दैनंदिन आहार विषयुक्त झाले आहे.
एकंदरीत हि परिस्थिती पाहता अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे शुद्ध असतील, यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यातच उत्पादन आणि उत्पन्न कमी असले तरी चालेल, पण सेंद्रिय शेतीच करणार असा विचार करणारे फार थोडे लोक आहेत. त्यातील एक म्हणजे नीता लांजेवार आहेत. अर्जुनी मोरगावच्या नीता यांनी ब्राह्मणटोला शिवारात एक एकर शेती विकत घेतली. त्यांनी पद्धतशीर नियोजन करत शेतात ठिबकची सुविधा केली. आता शेतात सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला.
नीता यांनी झुकिनीसह इतर विदेशी पिकांची लागवड केली. सुरुवातीला झुकिनी सारख्या विदेशी भाजीचा स्वाद नसल्याने स्थानिकांमध्ये रस नव्हता. मात्र आता हळू-हळू मागणी वाढली. त्यांनी आपल्या क्षेत्रात मिश्र भाजीपाला, फळबाग आणि फुलशेतीचा सुंदर संयोग साधला आहे. तसेच सेंद्रिय शेती पसंत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला आहे. आज या ग्रुपवर उपलब्ध भाजीपाल्याची नोंद होते.
मग इच्छुक व्हाॅट्सॲप धारक मोबाईलवर हव्या असलेल्या भाजीची नोंदणी करतात. नोंदणी झालेल्या भाजीची तोडणी होऊन त्याची पॅकिंग होते. यामुळे शेतमाल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो. तसेच लोकांना विषमुक्त भाजी उपलब्ध करून देण्याचा आनंद वेगळाच असतो.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup