शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM KISAN चे पैसे दुप्पट होणार?
भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार ऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात. एका अहवालानुसार, केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाले तर शेतकऱ्यांना 6,000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12,000 रुपये मिळू शकतात.
तीन हफ्त्यात मिळतात पैसे : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जात असतात. हे पैसे एकूण 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये पाठवले जातात. पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान तर तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात असतो.
पीएम किसान योजनेत आपले नाव कसे पहायचे?
● सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जा.
● यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
● या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
● आता डॅशबोर्डवर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा.
● आता Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
● आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल. यामध्ये आपण पाहू शकता की, योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात.
‘या’ लोकांना योजनेचा लाभ मिळत नाही! :
● सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी.
● दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारी.
● खासदार आणि आमदार.
या योजनेचा लाभ आत्तापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्यांना मिळाला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup