…म्हणून ‘या’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांदी!
शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अभ्यास केला तर किती फायदा होऊ शकतो? हे कांदा उत्पादकांनी सिद्ध केलं आहे. कारण बाजारात योग्य वेळी शेतीमाल दाखल झाला तरच फायदा होतो अन्यथा नुकसान तर निश्चितच असते. एक उदाहरण समोर आले आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांने हुशारूने साठवूण करुन ठेवलेल्या कांद्याला योग्य दर मिळाला आहे.
यंदा पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होईल. याचा विचार करता मागणी आणि पुरवठा यातील तफावत लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेला उन्हाळ कांदा बाजारात आणलाय. या कांद्याला एक दिवसाच्या फरकाने क्विंटलमागे 230 रुपये वाढवून मिळाले आहेत.
यंदाच्या पावसामुळे सर्वच शेतीमालाचे गणित बिघडवले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून लाल कांद्याची आवक आत्तापर्यंत सुरु झालेली असते. मात्र यंदा पावसामुळे लाल कांदा बाजारात अजूनही दाखल झालेला नाही. यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढत चालली आहे. या तफावतीचा अंदाज घेता राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरवात केलीय.
अनेकदा योग्य दर मिळाला नाही कि, शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. दरवर्षी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा लाल कांदा बाजारात अगोदर येतो आणि यालच चांगला दर मिळतो. यंदा मात्र, पावसाने या राज्यातील कांदा नाशिकच्या बाजारात दाखल झालेला नाही. त्याचाच फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झालाय. आपल्या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांद्याला बाजारात वाढीव दर मिळत आहे.
सध्या सुरु असलेल्या पावसामुळे इतर पिकांचे नुकसान झाले असले तरी साठवलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना तारले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup